.... आणि आपत्कालीन स्थितीत मी!
"सर, माझी तब्येत बरी नाही आणि मी पप्पासोबत दवाखान्यात जात आहे"
"सर, मी मामाच्या गावी आली आहे"
"सर, मी एकटी तयार आहे आणि बाकीच्या कोणीच नाहीत!"
सगळ्यात कहर म्हणजे हा फोन होता!....
"सर, ज्या वर्गात पाईप आणि कॅन्ड ठेवले होते त्याची चावी हरवली आहे!"
आता हताश होऊन वाळणाऱ्या झाडांची काळजी मनात येवून सरळ आपणच जावून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी मी निघालो. घरी असणारे पाईपचे तुकडे, कनेक्टर, बकेट्या माझ्या फोर व्हिलर मध्ये घेतल्या.
"14 किलोमीटर जावून परत यायचे आहे म्हणजे 28 किलोमीटर पैकी 15 ते 20 किलोमीटर गाडी तुला शिकायला मिळेल...येतेस का?" नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेल्या कन्येला ही ऑफर आवडली आणि ती सोबत आली.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करायची ठरले होते त्याप्रमाणे सगळे चालू होते. सुट्टीच्या काळामध्ये झाडांना पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून, त्यांना तारीखनिहाय नियोजन देवून, पाणी कसे द्यावयाचे हे समजून सांगितले होते. एका वर्गात शंभर फुटी रबरी पाईप आणि पाच वॉटर कँड तयार ठेवली होती.
पण हे सगळं फेल गेले होते; म्हणून आपत्कालीन परिस्थितीत सुट्टीत शाळेत आलो होतो!
गावाच्या मैदानाच्या ओट्यावर करमणूक म्हणून काही गावकरी ठाण मांडून गप्पात रममाण झाले होते. दोन - चार तरुण (चेहऱ्यावरून एखाद- दुसरा माझा जुना विद्यार्थी असणारी) मुले हाती मोबाईल घेऊन कुठल्याशा गेम खेळण्यात दंग होती. एकालाही असे वाटले नव्हते की 'शाळा आपली, गाव आपले तर दोन बकेट पाणी देण्यासाठी आपण जावे!' असो... "तुम्ही नाही आलात तर तुमची पगार थोडीच बंद पडणार आहे?!" असे जर उत्तर दिले तर मी निरुत्तर होईल म्हणून कोणास काही न बोलता आपले काम केले. आपणही मनाच्या आनंदासाठी हे करताना कोणाकडून अशी अपेक्षा ठेवणे योग्यही नव्हते!
इयत्ता तिसरीत शिकणारी कु श्वेता धनराज दहिफळे ही एकमेव विद्यार्थीनी पूर्णवेळ सोबत थांबली... तिच्यासह लेकीने मदत केल्याने अर्ध्यातासात मनाजोगते काम झाले होते.
बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी कु कोमल कृष्णा गुट्टे, अक्षरा सचिन गुट्टे, पूनम बालासाहेब गुट्टे आणि यशश्री कृष्णा गुट्टे यांनी झाडांना पाणी दिले.
खूप खूप अभिनंदन सर.🌹💐 गावकऱ्यांची शाळेविषयी ची अनास्था हा विषय काही नवीन नाही. पण त्या कडे दुर्लक्ष करून तुम्ही तळमळीने सुट्टीत सुद्धा शाळेत गेलात. वास्तविक तुम्ही गेला नसता तरी काही फरक पडला नसता.त्या श्वेता आणि रसिका सारख्या अनेक जणी तुमच्या कडून प्रेरणा घेऊन पुढे येतील आणि झाडांना येणार्या अंकुरा प्रमाणे गावकरी आणि विद्यार्थी यांच्या ही मनात शाळेविषयी च्या प्रेमाचा अंकुर पल्लवी त होईल अशी सकारात्मक अपेक्षा करू या. पुनश्च एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा 👍💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवा*** 🌹रेखा जोशी/कासांडे .
Thank you...
हटवाखूप छान प्रयत्न केले.मीपण मुअ.आहे.मीपरसबाग छान जोपासली आहे.कोणीही पाणी देण्याची काळजी करत नाही.मी स्वतः दिवाळी सुट्टी तर दरतिन दिवसा नी पाणी देण्यासाठी साठ किलोमीटर चा प्रवास करते..
उत्तर द्याहटवाजिपकेप्राशा कन्या वडवणी
उत्तर द्याहटवा