शनिवार, १३ जुलै, २०२४

1200 विद्यार्थी असणारी जिल्हा परिषदेची मानवत शहरातील शाळा!

  

1200 विद्यार्थी आणि 30 शिक्षक संख्या असणारी जिल्हा परिषदेची मानवत शहरातील शाळा! 
जिथे जाऊ तिथे आपोआप आकर्षक शाळेकडे मन खेचले जाते; त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेची असेल तर अधिकच! 


लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मानवत जिल्हा परभणी येथे जाण्याचा योग आला आणि शहराच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने मन मोहित केले.


मेहनत करणारे शिक्षक आणि त्यांना तितकाच चांगला सपोर्ट करणारी शालेय शिक्षण समिती तसेच त्या भागातील सुज्ञ राजकारणी मंडळी असली की जो सुंदर परिणाम होतो तो दिसणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी! 

एकीकडे मराठी शाळा आणि त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळत नाहीत म्हणून अडचणीत आहेत तिथे "बैठक मर्यादा संपल्यामुळे इयत्ता 1 ली ते 8 वी चे प्रवेश बंद आहेत" अशी सूचना या शाळेला लावावी लागते! 


शहरात असूनही भरपूर जागा, नियोजन करून खेळाची व्यवस्था असणारे मैदान, आकर्षक वर्ग रचना, अद्ययावत तंत्रज्ञान असणारे साहित्य, संगणक, सोलार पॅनल असणारी विद्युत पुरवठा, वृक्षांची लागवड आणि काळजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेणारे वर्ग अशी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.



शाळा हाफ डे असल्यानंतरही शाळेच्या कार्यालयात पालकांशी संवाद साधत असलेले मुख्याध्यापक श्री बनसोडे सर, सेवानिवृत्त होऊनही शाळेला सद्यस्थितीत आणण्यास मोठा वाटा उचलणारे केंद्रप्रमुख श्री लोहट सर, नवोदय आणि स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेणारे सर अशी ज्यांची ओळख आहे आणि शाळा परिसरात 24 तास ज्यांचे मन भिरभिरते असे आदर्श, क्रियाशील शिक्षक श्री नामदेव खिळदकर सर, माझे आत्तेभाऊ असलेले याच शाळेतील आदर्श शिक्षक श्री सोमनाथ मोकरे यांच्याशी शाळेतील उपक्रमाविषयी मनमोकळी चर्चा झाली. हा संवाद जणू 'या हृदयीचे त्या हृदयी' होता. सर्वांनी शाळेच्या प्रांगणात मला पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केले. 


शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक वृंदांचे कौतुक करताना बा. भ. बोरकर यांच्या कवितेची आठवण झाली 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुगंधाचे सोहळे' मेहनत घेत असणाऱ्या सर्व हातांचे - डोक्यांचे मनापासून अभिनंदन! तेवढ्याच तळमळीने व तनमनधनाने काम करणारे सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! तुमची शाळा पाहून खूप आनंद झाला; अभिमान वाटला!
अशा शाळांची गुणवत्ता कायम राहण्यासाठी तिथे असलेल्या स्टाफला त्यांची इच्छा असेल तर सेवानिवृत्त होईपर्यंत तेथेच ठेवले तरच त्या शाळा कायम त्याच स्थितीत राहतील असे माझे वैयक्तिक मत आहे. संबंधित भागातील अधिकाऱ्यांनी आणि सुज्ञ राजकीय नेत्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करायलाच हवेत. 





मंगळवार, ९ जुलै, २०२४

Simple Conversation

 


Here's a simple and interesting conversation between two primary school students, let's call them Rohan and Aisha:


Rohan: "Hey Aisha, what's your favorite subject in school?"


Aisha: "I love math! How about you?"


Rohan: "Mine's science! I love learning about animals and plants."


Aisha: "That's cool! I like math because I love solving puzzles and playing with numbers."


Rohan: "Yeah, math can be fun! Do you have any pets at home?"


Aisha: "Yes, I have a cat named Whiskers! She's so cute and playful."


Rohan: "Aww, I love cats! I have a dog named Max. He's really friendly and loves to play fetch."


Aisha: "That sounds like so much fun! Maybe we can play with our pets together sometime?"


Rohan: "Yeah, that would be awesome! Let's plan a playdate soon!"


This conversation is simple, relatable, and engaging for primary school students, and it covers topics like favorite subjects, pets, and playdates!

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

अबब! एक लाख किलोमीटर सायकल चालवली! असे असावे निश्र्चयी!

 

एक लाख किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम!


स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी सायकल चालवणे आवश्यक आहे हे सर्वच जण जाणतात; परंतु हा संकल्प सातत्यपूर्वक चालू ठेवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. परभणी येथील रहिवाशी श्री शंकर नागनाथ फुटके यांनी दररोज सायकल चालवण्याचा ठरवत आणि ते नित्यनियमाने पूर्ण करत एक लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. परभणीत कृषी विद्यापीठ कुलगुरू तसेच विविध मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून कौतुक केले आहे. 


श्री शंकर फुटके यांच्यासह परभणी येथील त्यांचे मित्र दरवर्षी पंढरपूर वारी सायकलवर स्वार होऊन करत असतात. यावर्षीही पंढरपूरला सायकलवर जात असताना शुक्रवारी ते परळी वैजनाथ येथे आले असता एक लाख किलोमीटर अंतर पार केल्याबद्दल त्यांचा सन्मान परळी येथील मित्रमंडळी, नातेवाईक यांनी केला. त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सायकल स्वारांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. 


सायकल चालवण्याचा वैयक्तिक फायदा आहेच; शिवाय सायकल चालवण्याचा प्रचार व प्रसार केला की अनेक लोक तुमचे मित्र बनतात हा सामाजिक फायदा आणि सायकल चालवण्यासाठी पेट्रोल लागत नाही म्हणजे राष्ट्रहित; तसेच धूर नाही म्हणून पर्यावरणपूरक वाहन! म्हणून सर्वांनी सायकल चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन याप्रसंगी श्री शंकर फुटके यांनी केले. 


या वारीतील प्रत्येक सायकलस्वार एक संदेश देत असून तशा आशयाचा फलक त्यांनी आपल्या सायकलवरही लावलेला आहे. समाजाचं प्रबोधनही या निमित्ताने ते करत आहेत. व्यसनापासून दूर राहणे, पर्यावरणाची काळजी घेणे, वाहतुकीचे नियम पालन करणे अशा संदेशांचा यात समावेश आहे. 


यावेळी जिजामाता यंगर्स ग्रुपचे ऍड रमेश साखरे, अजित गौरशेटे, रमेश चव्हाण, श्री शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिव जठार, श्री शिवहर उदगीरकर, श्री शांतलिंग फुटके, प्रा प्रवीण फुटके, चंद्रशेखर फुटके, सौ सुजाता फुटके, सौ प्राची फुटके यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.


 या सायकल वारीमध्ये प्रभावती रायडर्सचे अध्यक्ष माणिक गरुड, उपाध्यक्ष दिपक तळेकर, सचिव श्रीनिवास संगेवार, कोषाध्यक्ष राजेश्वर वासलवार, सहसचिव शंकर फुटके, सल्लागार सदस्य नीरज पारख, कल्याण देशमुख, गिरीश जोशी, संदिप पवार, प्रकाश बुजुर्गे, बालाजी तावरे,नितीन शेवलकर,ओमकार भेडसुरकर, सिद्धांत ओझा, महादेव मांडगे, दिनेश शर्मा आदी सायकलीश्ट सहभागी झाले आहेत. 

















शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

असा घेतला आनंद विद्यार्थ्यांनी शाळा पूर्वतयारी मेळाव्यात!

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील शाळेत इयत्ता पहिली वर्गासाठी प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला शाळा पूर्वतयारी मेळावा आज संपन्न झाला. 


प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन दिवस अगोदरच अंगणवाडीताईंच्या मदतीने निरोप देण्यात आलेला होता. 
सकाळी 9 ते 12 या वेळेत वेगवेगळ्या सात टेबलवर विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यावयाच्या तयारीची माहिती घेतली. 
नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, गणन पूर्व विकास व समुपदेशन या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खेळ घेऊन त्यांच्या क्षमता तपासण्यात आल्या.


या प्रत्येक टेबलची रचना आकर्षक करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी खेळही मुलांना आवडतील अशा पद्धतीने घेण्यात आले. 
सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कागदी टोपी घालून आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. 


या मेळाव्याची तयारी शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री चंद्रशेखर फुटके,  सरोजकुमार तरुडे,  राजेश्वर स्वामी, दत्तात्रय मुंडे, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी केली होती. अंगणवाडीताई राही मॅडम आणि कविता मॅडम यांचे मोठे सहकार्य लाभले.


उपस्थित पालकांनी या मेळाव्यातील उपक्रमाचे कौतुक केले.