बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न!























































ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ताट सजावट आणि राखी बनवणे स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
 
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्रिमंडळ सदस्य चि करण भागवत गुट्टे याने केले.  

नियमित अभ्यास आणि विविध स्पर्धा व त्यांची आकर्षक प्रमाणपत्रे व बक्षिसे मिळत असल्याबद्दल विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. 


मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी.

 


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी. विविध कार्यक्रमांचे आयोजन.  १४ ते १७ सप्टेंबर होणार कार्यक्रम. 


14 सप्टेंबर रोजी बीड मुख्यालयाच्या ठिकाणी रॅलीचे आयोजन.

14 सप्टेंबर रोजी बीड वगळता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 7.15 वाजता दोनशे विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन.

विद्यार्थ्यांचा वैयक्तिक व सामूहिक गीत कार्यक्रम.

16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता 75 दीप प्रज्वलित करून मुक्तिसंग्रामातील महात्म्यांच्या प्रतिमांच्या रांगोळी काढण्याचे निर्देश.

17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे भाषण.


बीड शिक्षण अधिकारी यांनी काढलेले पत्रक. 


पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध उपक्रम, स्पर्धांचे तारीखनिहाय नियोजन असणारे पत्रक 


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध स्पर्धांचे पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन : बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त

 




येथे जागर होतो विवेकाचा...!
कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व झुंजार स्वातंत्र्य सेनानी, बीड जिल्ह्याचे दिवंगत माजी खासदार व महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक मानवतावादाचे पुरस्कर्ते, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक, राजकारण हे समाजातील तळागाळातील लोकांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे एक माध्यम आहे हे तत्व अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे एक आदर्श राजकारणी आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे यासाठी अख्खं आयुष्य समर्पित करणाऱ्या कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी वैचारिक मंथन घडवून आणण्यासाठी आपण सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
टीप:QR कोडच्या माध्यमातुन देखील ऑनलाईन नोंदणी करू शकता.


येथे बोट ठेवा व स्पर्धेसाठी नोंदणी करा


अधिक माहितीसाठी संपर्क 9421443172  9421479877 
आयोजक : आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांडेखेल ता.परळी जि.बीड

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

पालकांनो, मला शुभेच्छा नको! तुमचा माझ्यावरचा विश्वास हवा आहे!



विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांमध्ये समंजस नातं असणं अत्यंत आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठीच पालकांनी शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या सुयोग्य शैक्षणिक वाढीसाठी हिच व्यक्ती काही करू शकते असा विश्वास ठेवायला हवा आणि शिक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवायला हवा. 


शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे नातं थोडसं धूसर आणि अविश्वसनीय होत आहे याची खंत आहे म्हणूनच मनातलं थोडसं या लेखातून व्यक्त होत आहे. सरकारी शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या कार्याबद्दल सरसकटपणे काही विधाने केली जात आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मराठी शाळांबद्दल, सरकारी शाळांबद्दल एक अविश्वास, असंतोष निर्माण होत आहे. 


षडयंत्र वगैरे असे काही मोठे मला कळत नाहीत; पण अगदी प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या शिक्षकांकडेही पालक आता संशयित नजरेने पाहत आहेत. त्यातला आदर लुप्त होत आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कामाला आता तराजूमध्ये मोजलं जात आहे. घड्याळाकडे न पाहता आपल्या कर्तव्याच्या वेळे व्यतिरिक्त वेळ देणाऱ्या, आपल्या कर्तव्यापलीकडेही काम करणाऱ्या शिक्षकांचाही त्यात काही स्वार्थ आहे का? अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. याची खंत अधिक वाटत आहे. 




सगळे शिक्षकच व्यवस्थित काम करत नाहीत हेच आपल्या डोक्यात काही लोक घालण्याचे काम करत असतील तर पालकांनो पुणे जिल्ह्यात नुकतीच 19 वर्ष आदर्श सेवा केलेल्या अरविंद देवकर सरांसारखी आत्महत्या प्रत्येक शिक्षकांनीच करायची का? इतकी पराकोटीची नकारात्मकता कशामुळे पेरली जात आहे? 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अनेक घटक कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती, त्याची मानसिक अवस्था, शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, शाळेत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शाळेत आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, पालकांची मानसिकता, पालकांचे घरातील शैक्षणिक वातावरण, पालकांची शैक्षणिक स्थिती, पालक देत असलेला वेळ, विद्यार्थ्यांना मिळत असलेली संगत, विद्यार्थ्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी बौद्धिक कुवत, शारीरिक क्षमता.... अशा कितीतरी गोष्टी ह्या प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनात महत्त्वाच्या असतात.... या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? 


ईश्वर करो की पालकांच्या मनातील हे मळभ दूर होवो, पालकांच्या मनामध्ये असा असंतोष निर्माण करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो आणि पूर्वी इतकेच शिक्षक पालकांचे प्रेमळ नाते तयार होवो, ज्यातून निरागस बालकांचा शैक्षणिक विकास होईल हीच शिक्षक दिनाच्या दिवशी प्रार्थना.