मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
नाते 'अधिक' दृढ करण्याचा 'मास'! अधिकमास!
मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहेत असे मला वाटते, रक्ताच्या नात्यापासून ते मानलेल्या, जोडलेल्या नात्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यासाठी मन अधिक प्रसन्न असायला हवं. हिंदू संस्कृतीत त्यामुळेच सणावारांची गर्दी आहे. सणांच्या दिवशी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदाने वागलं पाहिजे हे आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत.
'अधिकमास' ज्याला बरेच जण 'धोंड्याचा महिना' असे म्हणतात तो सुद्धा आपल्याला तीन वर्षानंतर एकदा मिळणारा अधिकचा मिळालेला एक सण आहे, म्हणजेच आपण 'अधिकचा आनंद' या दिवसांमध्ये साजरा करायला हवा. या महिन्यात आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांना अधिक दृढ करायला हवे.बऱ्याचदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांमध्ये काही कारणामुळे तणाव निर्माण झालेला असतो. हा तणाव तीन वर्षापेक्षा अधिक काळ चालू नये म्हणूनही कदाचित ही संधी आपल्याला देण्यात आलेली असावी

विशेषत: जावई आणि सासू - सासरे, सासरकडील मंडळी या नात्यांमध्ये तणाव अधिक येतात कारण हे नाते अधिक जवळचे असते; पण काहीही झाले तरी यातला तणाव हा तात्पुरताच असावा आणि पुन्हा नव्या सकारात्मक विचाराने हे नातं जोडलं जावं. मनातली जळमटी दूर करण्यासाठी तशा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संधी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातील ही एक संधीच आहे असे समजून आपण आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि जी नाती पूर्वीच अतिशय सकारात्मक रीतीने चालू आहेत त्यांना अधिकच दृढ करण्याचा हा सण आहे असे समजावे.
या मनोगताच्या सुरुवातीला मी असे म्हटले आहे की, मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहे, त्याचा अर्थ असाही घ्यायला हरकत नाही की आपल्याला जमेल तेवढे, झेपेल तेवढे खर्च करून हा अधिकमास साजरा करण्याचा प्रयत्न सासरवाडीकडील मंडळींनी करावा तर जावईबापूंनी आपल्या सासऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन जे दिले आहे ते 'अधिक' चांगले आहे असे समजून हा अधिकमास साजरा करावा!

मंगळवार, १८ जुलै, २०२३
सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी सुंदर हस्ताक्षर व इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत.
शुक्रवार, ५ मे, २०२३
सोमवार, १ मे, २०२३
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना दिला शाळारत्न पुरस्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील उपक्रम
![]() |
.jpeg)
परळी, दि
येथून जवळच असलेल्या मिरवट केंद्रातील कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. वर्षभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आज महाराष्ट्र दिनी मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्कॉलरशिप नवोदय तसेच विशेष अशा अभ्यासक्रमावर आधारित शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या स्पर्धांचा आयोजन केले जाते. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेतल्या जातात. शालेय मंत्रिमंडळाचे स्पर्धा मंत्री या उपक्रमाचे रेकॉर्ड ठेवतात. शालेय मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य या स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन व नियोजन करतात. वर्षभरातील स्पर्धांच्या आधारे शाळारत्न हा पुरस्कार दिला जातो.
आज महाराष्ट्र दिनी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामसेवक श्री नागरगोजे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, पोलिस पाटील श्री बाबुराव गुट्टे, श्री रामकृष्ण गुट्टे, श्री ज्ञानेश्वर गुट्टे, श्री महादू गुट्टे, श्री जयदीप गुट्टे, श्री अर्जुन दहिफळे, श्री सोपान गुट्टे, श्री अरुण खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता सहावी ते आठवी गटातून कु अमृता सोमनाथ गुट्टे, कु अंजली रामकिशन शेप, कु राधा अनंत गुट्टे तसेच तिसरी -चौथी गटातून कु समृद्धी सोमनाथ गुट्टे व कु पूनम बालासाहेब गुट्टे तसेच स्कॉलरशिप मध्ये इयत्ता पाचवीतून पात्र झाल्याबद्दल कु सुजाता धनराज दहिफळे ही शाळा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा अगोदर शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या गीतावर नृत्य केले. कागदी टोप्या डोक्यावर, हातात रंगीबेरंगी फुगे अशा छान वातावरणात पहिली देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव भाऊराव राठोड यांनी तसेच शिक्षकवृंदानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
शुक्रवार, २४ मार्च, २०२३
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
8th Scholarship: English Similes
गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा.
रविवार, २९ जानेवारी, २०२३
स्कॉलर केजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न